महत्वाच्या पोस्ट

निवडणूक -प्रश्नमंजुषा (४१)

Mpsc Election- Multiple Choice Questions                                             

                          



१) खालील विधाने पहा.

a) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे.
b) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२५ मध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक भौगोलिक मतदारसंघासाठी केवळ एकाच सर्वसाधारण मतदारयादीची व्यवस्था नोंदवण्यात आली आहे.
c) कलम ३२५ मध्ये असेही नमूद केले आहे की, केवळ धर्म, वंश, जात, लिंग यांपकी कोणत्याही आधारे कोणत्याही व्यक्तीस तिचे नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यापासून अपात्र ठरविता येणार नाही.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२६ नुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मतदानाच्या आधारावर घेतल्या जातील.
b) याद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि १८ वर्षे वयापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) मतदानाच्या हक्कांसाठी किमान वयोमर्यादा खाली १९८८ च्या ६१व्या घटनादुरुस्तीनुसार आणली गेली. वयोमर्यादा ही २१ वरून १८ वर्षे करण्यात आली.
b) एका व्यक्तीला एका वेळी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जास्तीत जास्त २ मतदारसंघांतून निवडणूक लढविता येते.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) योग्य पर्याय निवडा.

a) राज्यघटनेतील पंधराव्या भागात कलम ३२४ ते ३२९ मध्ये देशातील निवडणूक प्रक्रियेसंबंधी महत्त्वाच्या तरतुदी आहेत.
b) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला गरवर्तनाच्या किंवा अक्षम्यतेच्या कारणावरून संसदेच्या २/३ बहुमताने ठराव करून पदावरून काढले जाते. त्या पद्धतीनेच मुख्य निवडणूक आयुक्ताला बडतर्फ करता येऊ शकते.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३० नुसार लोकसभेत अनुसूचित जाती-जमाती यांच्याकरिता जागा राखून ठेवल्या जातील
b) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३१ नुसार आंग्ल-भारतीय समाजाला लोकसभेत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही असे राष्ट्रपतींना वाटत असेल तर राष्ट्रपती या समाजाचे जास्तीत जास्त २ सदस्य लोकसभेवर नामनिर्देशित करू शकतात.
c) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३३ एखाद्या राज्याच्या विधानसभेत आंग्ल-भारतीय समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्यास राज्यपाल या समाजाचा १ सदस्य नामनिर्देशित करू शकतात.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. फक्त a)
  D. फक्त c)

Mpsc Current Affairs March- प्रश्नमंजुषा (४०)

६) खलील दोन विधाने पहा.

a) निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या ४८ तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने व कोणत्याही प्रकारे निवडणुकीविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, कलम १२५ अंतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे.
b) ज्या मतदारसंघात मतदान होणार असेल त्या मतदारसंघात मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तास दारू किंवा अन्य मादक पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील विधाने पहा.

a) इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ई.व्ही.एम.)- मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिका आणि मतपेटय़ा यांच्याऐवजी मतांची नोंद करण्यासाठी वापरले जाणारे एक विद्युत उपकरण.
b) भारतामध्ये ई.व्ही.एम.चा प्रथम वापर केरळ राज्यातील परूर या विधानसभा मतदारसंघात १९८२सालच्या पोटनिवडणुकीत करण्यात आला.
c) भारताशिवाय भूतान व नेपाळ या राष्ट्रांमध्ये भारतीय ई.व्ही.एम.चा वापर होतो.

  A. वरील सर्व बरोबर
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a),b)बरोबर
  D. विधान b) c) बरोबर

-------------------------------------------------------------------------
८) निवडणूक आयोगावर संविधानाने सोपविलेली कामे पुढीलप्रमाणे-

a) मतदारयाद्या तयार करणे,
b) मतदारसंघाची आखणी करणे,
c) राजकीय पक्षांना मान्यता आणि मतदान चिन्ह देणे,
d) नामांकन पत्राची छाननी करणे,
e) निवडणूक खर्चावर नजर ठेवणे.

  A. फक्त a) c) e)बरोबर
  B. फक्त b) d) बरोबर
  C. a) b) d)आणी e) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) मतदारसंघांची पुनर्रचना करण्याची जबाबदारी मतदारसंघ पुनर्रचना आयोगावर असते.
b) भारतामध्ये आतापर्यंत चार वेळा मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आले. (१९५२, १९६३, १९७२, २००२)
c) पुनर्रचना आयोगाने घेतलेल्या निर्णयावर कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येत नाही.

  A. फक्त a) बरोबर
  B. विधान a) आणि c) बरोबर
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) राज्यघटनेच्या ७३व्या तसेच ७४व्या दुरुस्तीनंतर पंचायत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा अधिकार प्राप्त झाला.(आता ५०%)
b) स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही महिलांसाठी संसद तसेच विधानसभांत ३३% आरक्षणाचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही.
c) पाकिस्तानमध्ये महिलांना १७% आरक्षण दिले गेले आहे.

  A. a),b),c)
  B. b)आणि c)
  C. a) आणि b)
  D. एकही असत्य नाही


Mpsc Current Affairs March- प्रश्नमंजुषा (३९)


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.