महत्वाच्या पोस्ट

गारपीटग्रस्तांना मदत

Relief Package for Hailstorm-hit Farmers

Relief Package for Hailstorm-hit Farmers
Hailstorm-hit Area


फेब्रुवारी-मार्च या कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रचलित दरापेक्षा अधिक दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी 'विशेष पॅकेज' जाहीर करण्यात आले आहे.

विशेष पॅकेज


शेती पिकास मदत :-


  • कोरडवाहू शेतीस अधिकची विशेष रक्कम रु. 5,500 प्रती हेक्टर या व्यतिरिक्त प्रचलित दरानुसार रु.4,500 प्रती हेक्टर अशी एकूण रुपये 10 हजार इतकी मदत.
  • ओलिताखालील शेतीस अधिकची विशेष रक्कम रु. सहा हजार प्रती हेक्टर या व्यतिरिक्त प्रचलित दरानुसार रु. नऊ हजार प्रती हेक्टर अशी एकूण रुपये 15 हजार इतकी मदत.
  • फळपिकांकरीता अधिकची विशेष रक्कम रु. 13 हजार प्रती हेक्टर या व्यतिरिक्त प्रचलित दरानुसार रु. 12 हजार प्रती हेक्टर अशी एकूण रुपये 25 हजार इतकी मदत. 
  • पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुज्ञेय.


वीज देयके :-


  • गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची जानेवारी ते जून 2014 या कालावधीकरिताची वीज देयके राज्य शासनामार्फत भरण्यात येतील.


शेती पीक कर्ज :-

  • आपद्ग्रस्त शेतकऱ्यांकडून संबंधित बँका डिसेंबर 2014 अखेर पर्यंत कर्ज वसुली करणार नाहीत. डिसेंबर 2014 अखेर पर्यंत शेती पिकाच्या कर्जाची परतफेड करण्यास मुदतवाढ.
  • सन 2013-14 या कालावधीकरिता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीच्या कर्जाचे व्याज राज्य शासनामार्फत भरण्यात येईल.
  • आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे तीन वर्षांकरिता म्हणजे 2014-15, 2015-16 व 2016-17 या कालावधीकरीता पुनर्गठन.
  • गारपिटीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच घरांचे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Source:'महान्यूज'

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.