महत्वाच्या पोस्ट

आचारसंहिता म्हणजे काय?

Model Code of Conduct & its evolution


आदर्श आचारसंहिता आणि त्‍याची उत्‍क्रांती


        निर्भय आणि योग्‍य निवडणूका लोकशाहीच्‍या मूलभूत तत्‍त्‍वाला आकार देतात. यामुळे सर्व उमेदवारांना त्‍यांच्‍या योजना आणि कार्यक्रम मतदारांना सादर करण्‍यासाठी समानसंधी प्राप्‍त होते. या पार्श्‍वभूमीवर एमसीसी अर्थात आदर्श आचारसंहितेला अर्थ प्राप्‍त होतो.

  • सर्व राजकीय पक्षांना लढण्‍यासाठी समान क्षेत्र उपलब्‍ध करून देणे, 
  • निष्‍पक्ष आणि निकोप अभियान राखणे, 
  • पक्षापक्षातील मतभेद आणि संघर्ष टाळणे आणि शांतता आणि सुव्‍यवस्‍थेची हमी देणे हे आदर्श आचारसंहितेचे उद्दिष्‍ट आहे. 
  • केंद्रात किंवा राज्‍यात सत्‍तेवर असलेला पक्ष निवडणुकीत आपल्‍या अधिकारपदाचा गैरफायदा घेत नसल्‍याची खात्री देणे हाही एमसीसीचा उद्देश आहे. 
        लोकशाहीसाठीच्‍या भारतीय निवडणूक व्‍यवस्‍थेतील एमसीसी हे एक प्रमुख योगदान आहे. पक्ष आणि उमेदवारांचे वर्तवणूक आणि वागणुकीसाठीच्‍या नियमांचा संच म्‍हणजे एमसीसी होय. याचे वैशिष्‍टये म्‍हणजे राजकीय पक्षांच्‍या एकमताने एमसीसीच्‍या प्रलेखाला सुरुवात होऊन ते विकसित झाले आहे.
1979 मध्‍ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्‍या सल्‍लामसलतीने नवीन विभाग सुरू करत या नियमाची व्‍याप्‍ती आणखी वाढवली. या अंतर्गत सत्‍तेवर असलेल्‍या पक्षावर निर्बंध टाकण्‍यात आले. सत्‍ताधारी पक्षाकडून सत्‍तेचा गैरवापर होण्‍याच्‍या घटना टाळण्‍यासाठी हा नवीन विभाग सुरू करण्‍यात आला. (सीईसी-श्री. एस.एल.शखदार)
1991 मध्‍ये नियम आणखी कडक करत पुन्‍हा जारी करण्‍यात आले. (सीईसी-श्री.टी.एन.सेशन)

सध्‍याचे जे नियम आहेत त्‍यामध्‍ये राजकीय पक्षांच्‍या आणि उमेदवारांच्‍या वर्तवणुकीसाठी मार्गदर्शक तत्‍त्‍वे सांगितले आहेत. खासगी आयुष्‍यावर घाला नाही, जातीय भावनांना आवाहन नाही, बैठकांमध्‍ये शिस्‍त आणि शिष्‍टाचार, मिरवणूका, सत्‍ताधा-यांसाठी मार्गदर्शक तत्‍त्‍वे, निवडणुकांसाठी शासकीय सामग्री आणि सुविधा वापरण्‍यावर बंदी, मंत्री आणि इतर अधिकारी व्‍यक्‍तींना अनुदान, नवीन योजना जाहीर करण्‍याची संधी.

एमसीसी विकासकामांमधील अडथळा नाही

विकासकामांच्‍या मार्गात आचारसंहिता एक अडथळा असल्‍याची तक्रार नेहमी ऐकू येते. तथापि, अगदी छोटया कालावधीदरम्‍यान जेव्‍हा आचारसंहिता लागू असते, तेव्‍हा चालू विकासकामे थांबवली जात नाही तसेच ती विनाअडथळा सुरू ठेवण्‍याची परवानगीसुध्‍दा आहे. फक्‍त नवीन योजना ज्‍यांची अंमलबजावणी झालेली नाही, अशा योजना निवडणुका होईपर्यंत सुरू केल्‍या जाऊ शकत नाही (कुठल्‍याही आपत्‍ती निवारणासाठीचे बचाव कार्य) अशी प्रकरणे आयोगाकडे मान्‍यतेसाठी दिली जातात.


Source: pibmumbai.gov.in



No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.